मराठीत भक्तीगीते व भावगीते या दोन्ही गीत प्रकारात सुमनताईंनी छान रंग भरले. अशोक पत्की, दशरथ पुजारी, कमलाकर भागवत या संगीतकारांकडे त्या खऱ्या अर्थाने रमल्या. केतकीच्या बनी तिथे हे गीत ऐकताना पावसाळा सुरू झाल्याचा भास होतो तर नाम आहे आधी अंती च्या वेळी हात जोडून ब्रह्मानंदी टाळी लागते. ही किमया सुमन ताईंच्या स्वरांची.
हिंदीमध्येही आघाडीच्या बहुतेक गायक - संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. महंमद रफी साहेबांबरोबर त्यांची विशेष जोडी जमली.
सुमन ताईंच्या असंख्य हिंदी मराठी गाण्यांमधून एक-दोन गाणी निवडणे तसे कठीणच. मराठीतील राम मोरेंनी लिहिलेलं व दशरथ पुजारी यांनी स्वरबध्द केलेलं व हिंदीतील नूरमहल चित्रपटातील जानी बाबू कव्वाल यांनी स्वरसाज चढवलेलं गीत येथे निवडलं आहे..
Watch - या झोपल्या जगात..