ए भाय जरा..

खरं तर प्यार हुवा इकरार हुवा व ये रात भिगी भिगी या गाण्यांनी राजकपूरचा आवाज म्हणून ओळख निर्माण झाली होती, पण पुढे ए भाय जरा देख के चलो सारखा एखाद दुसरा अपवाद वगळता मुकेशच राजकपूरचा आवाज झाला आणि पद्मश्री, पद्मभूषण व दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त प्रबोध चंद्र उर्फ मन्ना डे यांच्या संगीत करिअर ला नाही म्हटले तरी थोडा ब्रेकच लागला. 

मोजकच मग ते शास्त्रीय धाटणीचे गाणं असो, कव्वाली असो वा एक चतुर नार सारखं उडतं गाणं असो, मन्ना डे यांचं जवळ जवळ प्रत्येक गाणं हिट झालं. हा एक प्रकारचा रेकॉर्डच म्हणावा लागेल. हिंदीतील बहुतेक प्रथितयश संगीतकरांबरोबर मन्ना डेनीं काम केलं. महंमद रफी साहेबांना सुद्धा मन्नाडेंच्या शास्त्रीय गायकीचे विशेष कौतुक होतं. 

आमच्या पिढीला मन्ना डे माहित झाले ते जंजीर मधल्या यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी या गाण्यामुळे. त्या आधी ही ते प्राण, बलराज साहनी यांचा आवाज म्हणून फिट झाले होतेच. ए मेरे प्यारे वतन, ओ मेरी जोहरा जबी, कस्मे वादे प्यार वफा सब, तू प्यार का सागर है ही गाणी म्हणजे मास्टर पीसच.

मराठीत ही मन्ना डे यांच्या वाट्याला चांगली गाणी आली. गदिमांचं सुप्रसिध्द घन घन माला नभी दाटल्या तर अवीटच. अ आ आई म म मका, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, प्रीत रंगली ग, धुंद आज डोळे सारखी गाणी त्यांनी अजरामर केली. 

आजचं आपलं गाणं सीता और गीता मधील मदारी धर्मेंद्र वर चित्रित केलेलं, आनंद बक्षींच, आर डी बर्मन यांनी स्वरबद्ध केलेलं. जरा तसं कोपऱ्यातलंच..